॥ जय श्रीराम ॥
आई गेल्यानंतर श्रीमहाराज आयोध्येहून इंदूर , नाशिक येथे मुक्काम करून गोंदवल्यास परतले. येव्हाना श्रीमहाराजांना गोंदवले सोडून एक वर्षांच्यावर काळ लोटला होता. गीताबाईंची आठवण सर्व गावाला होत होती.
सन १८९६ उजाडले पुन्हा दुष्काळ. परंतू पूर्वीच्या दुष्काळापेक्षा याची तीव्रता कमी होती. काशीहून परत आल्यावर लगेचच शेतीतील कामे काढून श्रीमहाराजांनी लोकांना खायला घातले मागील दुष्काळा प्रमाणॆ यावेळीही जे लोंक शेतात कामाला येत त्यांना एक वेळचे अन्न मोफत दिले जाई. तसेच मंदिरात रोज दहाहजार जप करणारास अन्न मोफत दिले जाई. याच काळात गाईंसाठी श्रीमहाराजांनी एक गोशाळा बांधली. Read the rest of this entry »
॥ प्रतिक्रिया ॥